

Pune News: महाराष्ट्र राज्य माध्यमकि व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल मंडळाने सोमवारी (ता.५) ऑनलाइन जाहीर केला.
यंदा ९१.८८ टक्के एवढा निकाल लागला असून, सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९६.७४ टक्के, तर सर्वांत कमी निकाल लातूर विभागाचा ८९.४६ टक्के लागला आहे. यंदाही मुलींची बाजी मारली असून, मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९४.५८ टक्के, तर मुलांची टक्केवारी ८९.५१ टक्केएवढी आहे.
मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आयटीआय या शाखांसाठी एकूण १४ लाख २७ हजार ८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
त्यापैकी १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, त्यापैकी १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे.
निकालाची विभागनिहाय टक्केवारी खालीलप्रमाणे
पुणे --- ९१.३२
नागपूर --- ९०.५२
छत्रपती संभाजीनगर --- ९२.२४
मुंबई --- ९२.९३
कोल्हापूर --- ९३.९४
अमरावती --- ९१.४३
नाशिक --- ९१.३१
लातूर --- ८९.४६
कोकण --- ९६.७४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.