
Marathwada Farmer Life End : राज्यात यंदा पावसामुळे अनेक जिल्ह्यांची परिस्थिती बिकट बनली आहे. पाऊस नसल्याने सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला आहे. दरम्यान मराठवाड्यात शेतकरी आपल्या जिवाला कंटाळून टोकाचं पाऊल घेण्याचे काही थांबत नसल्याचे चित्र आहे. आज एका दिवसात औरंगाबाद जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. दोघांनी विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील हतनूर येथील दिनकर बिसनराव बिडवे (वय ४८), तर फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा येथील कारभारी माणिकराव पाटोळे (वय ५५) तिसरा शेतकरी वैजापूर तालुक्यातील जरूळ येथील अरविंद साहेबराव मतसागर (वय ४३) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
दरम्यान कन्नड तालुक्यातील हतनूर येथील दिनकर बिसनराव बिडवे या शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. १०) रोजी दुपारी दोनच्या दरम्यान उघडकीस आली. याबाबत पोलीस पाटील प्रकाश पवार यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली. बिडवे यांनी शेतात पीक येत नाहीतर होत असलेल्या कर्जाच्या बोज्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
दुसरी घटना पीरबावडा येथील शेतकऱ्याच्या बाबत आहे. मागची काही महिने पाऊस नसल्याने वाया गेलेल्या पिकाच्या नैराश्यान शेतकऱ्याने विषारी औषध घेतले होते. गेली काही दिवस औरंगाबादच्या घाटी रुग्णालायत त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.
पावसाअभावी पीक गेल्याने तर काढलेले कर्ज डोक्यावर वाढत चालल्याने अरविंद यांनी शनिवारी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात आल्यावर कुटुंबीयांनी त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.
रविवारी दुपारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचे भाऊ संतोष साहेबराव मतसागर यांनी दिलेल्या माहितीवरून वैजापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.