
औरंगाबाद :मराठवाड्यात मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासात परतीच्या (Monsoon) पावसाकडून (Heavy Rainfall) औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांना झोडपणे सुरूच होते. या तीनही जिल्ह्यातील १३ मंडळात अतिवृष्टी झाली तर अनेक मंडळात हलका, मध्यम, दमदार पाऊस झाला.
लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र काही मंडळात तुरळक हलका झालेला पाऊस वगळता पावसाने उसंतच घेतल्याचे चित्र होते. परतीचा पाऊसामुळे कपाशीची बोंड काळी पडली असून वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहेत.
सोयाबीनची परिस्थिती यापेक्षा वेगळी नसून अनेक शेतातील सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ६५ मंडळात तुरळक, हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला.
जिल्ह्यातील तालुक्यात सरासरी ३० मिलिमीटर सिल्लोड तालुक्यात सरासरी ३२.६ व सोयगाव तालुक्यात सरासरी ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील सर्व ४९ मंडळात पावसाची लागलेली हजेरी तुरळक, हलकी, मध्यम ते दमदार स्वरूपाची होती. जिल्ह्यातील २८ मंडळात १४ ते ५२ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.
अंबड तालुक्यात सर्वाधिक सरासरी ६१.८ मिलिमीटर, जालना तालुक्यात ३९.८ मिलिमीटर तर घनसावंगी तालुक्यात सरासरी ३७.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई धारूर, परळी, केज, शिरूर कासार आधी तालुक्यात काही मंडळात झालेला तुरळक, पाऊस वगळता उसंतच घेतल्याचे चित्र होते.
जिल्ह्यातील पाटोदा, आष्टी, गेवराई या तीन तालुक्यातील वीस मंडळात १५ ते ६१.८ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. गेवराई तालुक्यातील दोन मंडळात अतिवृष्टी झाली. लातूर जिल्ह्यातील सहा व उस्मानाबाद जिल्ह्यातील २३ मंडळात तुरळक पाऊस झाला. दोन्ही जिल्ह्यातील इतर मंडळात पावसाने उसंतच घेतली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.